Tuesday, April 22, 2008

धरल तर चावतय ..............

मोठे मोठे प्रश्न! त्यातला सगळ्यात मोठा म्हणजे पैसा, नेमका तोच माझ्याकडे कमी असतो, कधी कधी वाटते आपण आहे नाही ते सारे याच्यासाठी वीकून टाकावे ! अणी मग लक्शात येते, की अरेच्या आपण तेच तर करतोय! माझ्याकडे ऐक डोके आहे ते तर मी रोज वीकत असते कधी वीचारांच्या स्वरूपात तर कधी कल्पनान्च्या. माझे दोन हात अहोरात्र काम करत असतात ते हे पैश्यां साठीच आणी माझे पाय ते ही सर्व पायपीट करतात ते ह्या पैश्यांसाठीच . मग अता माझ्या कड़े वीकायला काय शील्लक राहते? आणी इतके सगळे करुनही पुन्हा हातात काहीच उरत नाही! याचेच मला फार वैमनस्य येते. मग वाटते सगळे व्यर्थ आहे . सोडून देउया काम करणे.
एक दीवस मनाशी नीश्चय करून मी सुट्टी घेतली, एक- दोन नाही चांगल्या महीन्या भाराची सुट्टी घेतली. ज्या व्यक्तींचा मझ्यावर फार परीणाम होतो अश्या व्यक्तींपासून दूर रहायाचे ठरवले . या काळात काम घेणे कटाक्शाने टालायाचे ठरवले आणी आत्मपरीक्षनाला अवलंब केला.
काही दीवस आनंदत गेले. पहीले दहा एक दीवस काहीच वीशेष घडले नाही, परन्तु त्यानंतर माझ्या अर्थ रेशेला नीवांत बसवेना! मी तीच्या इशार्यावर पळत नाही म्हणजे काय? प्रयत्नही करत नाही! ही तर हद्दच झाली! मग मला फ़ोन येऊ लागले, कसले काय, कामाचे ! कधी नव्हे ती कामं माझ्या पायाशी लोळण घालू लागली, आणी मी! तपस्वी मुनींप्रमाणे सर्वांना एकमेव उत्तर देत होते, नाही!
प्रत्येकच गोश्टीत अस म्हणतात की धरलं तर चावतय आणी सोडलं तर पळतय पण मी म्हणते सोडले की पळत आणी आपण पुन्हा त्याच्या पाठी गेलो नाही की गुमान शेपुट घालून पाठी पाठी येत तेच आपले नशीब.

Wednesday, April 2, 2008

अंतरंगाचे कान

मला कधी कधी वाटायला लागते की माझे कान कायमचे बंद होणार की काय? कीवा माझ्या डोक्यमध्ये कळ येउन माझे डोके वीचार करायचे बंद होउन जाइल की काय? माझ्या डोकेदुखीने अचानक डोळ्याला दीसणे बंद होईल की काय ?
मी रात्र रात्र या वीचाराने झोपू शकत नाही। डोळ्याला डोळा लागला की आतून कोणीतरी कींचाळल्याचा भास होतो आणी मी दचकून उठते. जर चुकून झोप लाग्लीच तर कोणीतरी सतत घाबर्लेला एक घाणेरड्या बंद खोलीत सडणारा जीव मला खुणावत असतो , ज्याचा सतत कोणीतरी पाठलाग करत असते, कींवा तो सतत एकटा असतो, पण प्रणांतीक घाबर्लेला असतो! तो मला घाबरवुन सोडतो ! मग माझी कमालीची घुसमट होते, मी आवेगाने उठून बसते। ग्लानी येत्च असते परन्तु झोपण्याची भीती वाटते। पुन्हा प्रयत्न केला तर ते भयाण तांडव पुन्हा सुरु होईल याची भीती! रात्रं दीवस तणावात घालवुनही सर्वान समोर मात्र माझा चेहरा कायम हसत्मुख असतो । मला माझा ताण लापव्ता येतो। अलीकडे तर मला राग लोभ जाणवेनासा झाला आहे! हसर्या चेहेर्यच्या पाठचे माझे डोके कायम कोणीतरी कुरतडत आहे अशी सतत जाणीव होत राहते।
माझे शब्द माझ्यापासून दूर गेले आहेत। माझ्या भावना कृत्रीम झाल्या आहेत, मलाच माझे दाख्वाय्चे दात् आणी चावाय्चे दात वेगळे करता येत नाहीत! भावना मुक्या होउन मनाच्या खोल कोपर्यात बंदीस्त झाल्या आहेत आणी रोज आक्रंदत आहेत!माज्या पर्यंत पोहोचू पाहत आहेत! परन्तु मी माझे कान बंद करून घेतलेले आहेत। या सार्याचा परीणाम मला सरळ दीसत असूनही मी त्याच्या कड़े काना डोळा करते आहे! आणी सग्ल्या आंतरीक भावनांना दडपून टाकण्यासाठी मी मनातील वीचारांची वाटच बंद केली आहे! मी वीचार करणे सोडून दीले आहे, कदाचीत म्हणूनच माझ्या मनात वीचार आला की मी तो पळवुन कसा लावायचा या बद्दलच वीचार करते! आणी वीचारांती सर्व वीचार बंद करते।
मग मी का दोष द्यावा माझ्या इंद्रीयांना ? आणी का घबरावे त्यांच्या असहकाराला ? शेवटी ते ही मला तेच देताय्त जे मी त्यांच्या बरोबर करत आहे! ......... परस्परांचे न ऐकणे!