Saturday, February 6, 2010

व्यवधान

आपल्या सहचराशी आपले पटेनासे होते आणी मग एक दिवस आपण वेगळे होण्याचा निर्णय घेतो. एक मेकांपासून बराच काळ वेगळे राहेल्यावर अचानक काही काळाने आपल्याला त्यांच्यातले गूण दिसू लागतात, ति व्यक्ती मग हवी हवीशी आणी जवळ असावी असं वाटू लागतं, बर्याच वेळी याची परीणीती त्या व्यक्तीला गमावल्याच्या पश्चात्तापात होते. मूळात गमतिशीर सत्य बर्याच जणांच्या लक्शात येत नाही. ति व्यक्ती जोवर आपल्या आयूश्यात असते तोवर आपल्याला हे गूण का दिसत नाहीत? हे गूण तेव्हाच दिसले असते तर आपण बहूदा त्या व्यक्तीला गमावले नसते! मग ते तेव्हा कूठे लपून बसले होते? या आणी अश्या कित्येक प्रश्नांची भेंडोळी डोक्यात जमू लागतात. शेवटी हे आपलं कमनशीबच! आपण माणूस ओळखूच शकत नाही, किंवा आपल्याला माणसांची किंमतच नाही! ही अथवा तत्सम बिरूदे आपण स्वतःला लाउन, सेल्फ पिटी या सहाजीक रस्त्यावर स्वतःला झोकून देतो. पण ही खरच या प्रश्नांची उत्तरे असतात का?

वास्तवात त्या व्यक्ती बरोबर काढलेला दिवस न दिवस आठवला तर तूम्हाला या प्रश्नांची उत्तरे सहज मीळू शकतात. त्या व्यक्तीतले हे सूप्त गूण आपल्याला जाणवत असतात आणी म्हणूनच आपण त्या व्यक्तीच्या जवळ जातो, किंवा त्या व्यक्तीला आपल्या जवळ येउन देतो. मग काही दिवसांनी आपण खूप जवळ आल्यावर आपण त्यांना आपल्या आयूश्याचा नकळत एक हिस्सा बनवून घेतो. हि व्यक्ती आयूश्यात येइ पर्यंत सारं काही आपलं आपल्या मर्जी प्रमाणे चाललेलं असतं. त्यात कोणाचाही भौतीक किव्वा वैचारीक हस्तक्शेप नसतो. मग हळू हळू आपण त्या व्यक्तीला वैचारीक पातळीवर consider करू लागतो. त्यांच्या विचारांचा ताळमेळ आपणच आपल्या विचारांशी घालू लागतो. आणी इथेच सारी गफलत होते. तूमच्या विचारांत बदल करण्याच्या पासपोर्ट्बरोबर ति व्यक्ती तूमच्या आयूश्यातल्या महत्वाच्या निर्णयांत हस्तक्शेप करण्याचा व्हिसा मिळ्वते. आणी मग भौतीक असो वा वैचारीक असो, सर्व पातळीवर स्वैर संचार करू लागते. त्या व्यक्तीच्या प्रतिभेने झाकोळले जाउन आपणही हा सोहळा कौतूकाने पाहातो, त्याचा आनंदही घेतो, पण नव्याचे नउ दिवस संपले की मात्र हिच प्रतीभा बोचू लागते.आपल्या आत्म केंद्री आयूश्यातला हा हस्तक्शेप आपल्याला आपल्या स्व पासून दूर घेउन जाइल का या भीतीने आपण त्या व्यक्तीच्या हातात दिलेला पास पोर्ट परत घेउ पाहातो. ते शक्य झाले नाही कि आपणच त्या व्यक्तीतील बारीक बारीक चूका काढू लागतो! आणी हे सारे इतके नकळत होते, कि आपल्याला जिवापाड प्रेम, आदर असणारी ति व्यक्ती अचानक आपल्या साठी एक शत्रू बनून बसते. मग वाद वाढतात, मतभेद दूणावतात, आणी शेवटी या सर्वाचा शेवट एकमेकांपासून दूर होण्यात होतो.

मग पून्हा आपल्या आयूश्याची व्यवधाने आपल्या हातात येतात आणी आपण काहीच काळात या स्थीत्यंतरातून सावरतो. मग आपण गेल्या परिस्थीचा त्रयस्थ म्हणून विचार करू लागतो. तोवर दूःखर्या जखमा बर्या झालेल्या असतात, स्वाभीमावरची सूज आटोक्यात आलेली असते. मग आपण क्शमाशील होतो. गेलेल्या काळाकडे तिर्हाइताच्या नजरेने पाहू लागतो, त्यातिल दूःख परदूःखा सारखे शितल वाटू लागते. तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीतले गूण दिसू लागतात आणी पश्चात्तापाची भावना मनात येउ लागते.

मूळात प्रश्न इथे संपतच नाही. प्रश्न इथून चालू होतात. कोणाला आपल्या आयूश्याच किती व्यवधान देउ करायच हा यक्श प्रश्न ज्याला सोडवता आला नाही त्याला इतरांतल्या गूणांना मूकावेच लागणार! नाहीतर जन्मभर मान तूकवून त्यांच्या कर्तूत्ववान छायेत जगावे लागणार! हा निर्णय सर्वस्वी तूमच्याच हातात असतो. त्या निर्णयाचं व्यवधान यावं लागतं, ते एकदा मिळालं की सगळे प्रश्न आपोआप सूटतात, कोणताही पश्चात्ताप मागे न ठेवता.

कोणीतरी फार छान लीहून गेलं

We fall In love with personality but marry with a character.

Sunday, January 17, 2010

Lost

can i rewind and go back in time
to correct my life and to make it more mine.

leave the shallow ones below and float amongs the cream
and will never ever meet some ppl in my wildest dream

will go on the path i always wanted to follow
will never face the expectations sick and hollow

how i wish i could change what i had brought along
and will never ever ,ever go wrong.....

Tuesday, January 12, 2010

कातरवेळ

डोळ्यासमोर सारी कामे नाचत होती, पण आज मन कुठेतरी दूसरीकडेच होते. कॊंप्युटर वर सतत काम करुन पाठ आखडली होती, आणी शेवटचे अन्न ग्रहण कधी केले ह्याचा काही हिशोबच उरला नव्हता. तरीही डोळे स्क्रीन सोडत नव्हते. कातरवेळ, तिन्हीसांज अस जे काय म्हणतात ती झाली होती, पण तीथे बघायला वेळ कोणाला होता? ऒफीसातले सगळे निघून गेले होते. मला क्शणभर फार एकाकी वटलं. आल्या पावली मी त्या एकाकीपणाला हकलवलं आणी पुन्हा एक्सेल शीट मध्ये डोक घातलं. पण हळू हळू डोळेही खुपच झोंबायला लागले, आता ब्रेक घेणं अपरीहार्य होतं ! डोळ्यांवर पाणी मारण्या साठि मी डेस्क सोडला

गार पाण्याच्या हबक्याने माझ्या डोळ्यावरची कामाची गुंगी उतरली. पुन्हा कॊंप्युटर वर बसण्याची इच्छा होइना. ऒफीसात कुणीच नसले तर जाता जात पिउन दोन खिडक्या उघडून जातो. त्याला माझी उशीरा पर्यंत काम करण्याची सवय परीचयाची आहे. ऒफिसातील बाकी सारे जितक्या लवकर जाता येइल तितके आनंदात असतात, पण मला कसलीच घाइ नसते.

माझी पावलं नकळत खीडकी कडे वळली , खिडकीच्या बाजुला उभ्या कॊफी मशीनला एक कॊफी बनवायला सांगून त्याच्या प्रतीक्शेत मी खिडकी जवळ गेलो. बाहेरच आभाळ तांबूसल होतं, काळ्या ढगांच्या किनारीला सोनवर्ख फुटला होता, आभाळात केशर उधळलं होतं कोणीतरी, मनात आलेल्या या कवीकल्पनेने मला गालातल्या गालात हसु आलं, थोड वेडगळ वाटलं. मनातले विचार झटकत मी पुन्हा कॊफी मशीन कडे वळलो, तेव्हाच वार्याची एक झूळूक आली, तिच्या आर्द्र थंडाव्यात गरम कॊफीचा गंध मिसळला आणी त्या सोबत आली तिची आठवण….

बॅंड स्टॅड च्या कॅफे मध्ये समुद्रावरुन घोघावत येणारा वरा आणी त्या बरोबर दरवळणारा टेबलावर ठेवलेल्या कॊफीचा गंध, अगदी असाच! आजच्या सारखा…. पण आज त्यात तिच्या हलक्या स्मीताचा दरवळ नव्हता…. मन विशण्ण झालं…. अंतरात एक अजाण काहूर उठलं, ज्याला उत्तरही नव्हतं आणी उपायही सापडणार नव्हता. हीच हूरहूर रोज एक्सेल शीट्स मध्ये डोक घालून नजरेआड करण्याचा प्रयत्न करत आलो, पण आज मात्र मला त्या कातरवेळेने गाठलं होतं…..

Monday, December 14, 2009

कळत नकळत

कळत नकळत काळ सरुन जातो, आणि बरिचशी नाती काळाच्या पडद्याआड दडी घेतात. काही काळासाठी का होइना ती दिसेनाशी होतात, आणि मग मनात फक्त हूरहूर राहाते.

रोजच्या बिझी शेड्यूल मधून सर्वांन्ना हक्काचा मिळणारा निवांत वेळ म्हणजे,झोपण्या आधीचा वेळ! त्या वेळात आपल्याला काय काय करायचे आहे आणि काय काय करायचे राहिले ते सारे काही आठवते, मग नकळत आपण त्या गोश्टींची मनाशी खूणगाठ बांधतो आणि दिवस भर वणवण करुन थकलेला देह गादीवर टाकतो. मनाशी बांधलेल्या या खूणगाठीही स्म्रूतीच्या पडद्या आड कधी जातात ते कळत नाही, आणि मग अचानक एक दिवस एखादी बातमी येते.... मनातून आंतर-बाह्य हलल्या सारखे होते. त्याच वेळी जर ते केले असते तर?? असे प्रश्न पडू लागतात पण तोवर खूपच उशीर झालेला असतो. ज्या व्यक्तीशी आपण आज बोलू , उद्या फोन करु , परवा पत्र पाठवू अश्या खूणगाठी बांधलेल्या असतात त्या नियतीच्या एका झटक्याने पुर्णपणे तूटून पडतात, निश्क्रीय आणि निरर्थक होतात. खूणगाठीतून जिवंत राहिलेली हवी हवीशी वाटणारी, तरी वेळेअभावी दूर राहिलेली ती व्यक्ती परत कधीच दीसणार नाही याची बोचरी जाणीव चिमटा काढून जाते…. ते मनात आले होते तेव्हाच केले असते तर?? फक्त एक दहा आकड्यांचा नंबर तर डायल करायचा होता! फक्त अर्धा तासच कंसेशन घ्यावे लागणार होते! फार फार तर एक दिवस रजा काढायला लागणार होती! त्या वेळी मोठी वाटणारी ही सगळी कारणे आता मात्र फार शुल्लक वाटू लागतात. आपण खरच ही कारणे उभी करत होतो का ती खरच होती?? स्वत:चीच चीड येउ लागते. जरी आज पर्यंत त्यांना फोन नाही करू शकलो, त्यांच्याकडे जाउ नाही शकलो, तरी त्या व्यक्ती या खूणगाठींत बान्धून राहील्या होत्याच मनात! पण त्या अश्या जागी होत्या जिथे कोणीच त्यांना पाहू शकले नाही. लोक मात्र तोंड उघडून वाटेल ते बोलले, इतके जवळचे सोयरे तरी साध्या अंतयात्रेलाही आले नाहीत! त्यांना कसा कळणार या अपराधी मनाचा सल? ज्या व्यक्तीच्या खूणगाठी घेउन वर्श वर्श नांदलो, त्याचाच निपचीत चेहरा कसा पाहावेल सांगा? कदाचीत तो पाहील्यावर खूप बोलावेसे वाटले तर?? तर त्यांच्या चेहेर्यावरचे भाव पाहाण्यासाठी मन आसुसेल, आणि ते भाव कायमचे विरून गेले आहेत या सत्य परीस्थीतीचा धक्का सहन नाही करू शकलो तर???? त्यांच्या भावनांचा शेवटचा अपडेट ही इतका जूना झाला आहे की पूढे ती व्यक्ती एक निश्चल प्रेत म्हणूनच मनात राहून गेली तर???? या भावनांच्या भेंडोळ्यातून अचानक गाड्यांचा हॊर्न कानावर येतो. सिग्नल सुटलेला असतो आणी आपणच पुढच्या रांगेत असतो, आपल्यासारखेच घायकूतीला आलेले बरेच जीव दात ओठ खात आपल्यावर हॊर्न स्वरूपी ओरडत असतात, तंद्री तुटते, नकळत गाडीचे व्हिल हाताने वळवले जाते, डोळ्यासमोरील त्या व्यक्तीच्या आठवणी जाउन त्याची जागा दारावर ठेवलेल्या मस्टर ने घेतलेली असते, बॊस आता आपल्यावर कसा खेकसणार याची पूनर उजळणी चालू झालेली असते. घड्याळ मॅरथॊन धावत असते,कोप्रर्या वरचा पांडू आपल्यावरच डोले लावून बसलेला असतो. नेहमी ओघाने येणार्या काही जबाबदार्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात, आज त्यांचा किंचीत त्रास होत असतो पण नकळत आपण त्याला सोडचीठ्ठी देतो. आज रात्री झोपायच्या आधी काही आठवले नाही तरी गेलेला वाइट दिवस नक्की आठवणार अशी खुण मनाशी पटते. ’अरे विजेचे बिल भरायचे रहीले आहे!’ , ’अरे, मोबाइल रिचार्ज करायचाय !’ , ’घरी जाताना आज भाजी नाही नेली तर खरच घरात जेवण होनार नाही !’ , मी किती निश्काळजी आहे? महत्वाच्या गोश्टी अश्या कश्या विस्मरणात जातात? आपण मनाशी या सगळ्या गोश्टी उरकण्याची खुणगाठ बांधतो. मनातील एक खुणगाठ मात्र कायमची सुट्लेली असते , कळत नकळत….

Wednesday, September 9, 2009

coming back to life

all the crazy things i did in my past are now looking like just another day i spent long back'. they hold no significance in my life anymore. and the horizon is looking much clearer than ever. i know where i am heading! i cant see my destination but i know my direction. i know which wind is going to help me go towards my destination. i just had to let myself go for a while to find myself, to emerge from my own ashes like a phoenix.......... i am coming back to life after a long and dirty sleep.

Tuesday, June 23, 2009

rain rain......

बरोबर १० महिन्या पूर्वीची गोश्ट आहे. हाच दिवस होता तो ......
मन अवखळ झाल होतं .. मुंबईतील सरता अवखळ पाउस.. मन पुन्हा एकदा १६ वर्शांच झालं होतं..
स्वप्नांना पंख फुटले होते.... पायातल्या बेड्या आपो आप गळून पडव्यात तस काहिस झालं होतं. महत्वाकांशेचे क्शितीज रूदावलं होतं. सरं काही मुठीत आलय अस वाटू लागलेल......रुतू तोच.... भावना तीच.... दीवसही तोच.. मग आज या पंखांना निराशेची किनार का? आज या स्वप्नांना अश्रूंचा ओलावा का??

rain rain come again.....
wash away all the pain....

Tuesday, March 24, 2009

आठवण

नाही येत मला दडपता आलेली तुझी आठवण,
अन विसरून जाता तुझ्या सारख सारं काही पटकन

मग म्हणूदेत मला ते कमकुवत मनाने
जागते ठेवते मी, प्रेम निखार्यात धिराने.

वाळू टाकून विझवू पाहात नाही मी मन वणवा तव आठवणींचा
विझतो विखार माझ्या धूमसत्या तारुण्याचा.

जाउदे... तसे ही आता, ही आग का असावी ?
मनात पेटला वणवा अन आस का विझावी ?????