Tuesday, August 3, 2010

जिद्द

मरण जर असेल आड तर जगण ही खाइ आहे ,

जगण्याचं अमिश दाखवू नका आम्हाला मरण्याची घाइ आहे

कुंचल्याने कोरलेल्या तुमच्या वैभवाला गिरवणारा आमचाच टाक,

आणी त्यावर रंग चढवणारी आमच्याच रक्ताची शाइ आहे

जगण्याचं अमिश दाखवू नका आम्हाला मरण्याची घाइ आहे

झिजलो उदर्नीवाहासाठी गोळा बेरीज शून्य झाली,

आता मात्र उत्तर शोधण्यासाठी झूंज देणेच सही आहे

जगण्याचं अमिश दाखवू नका आम्हाला मरण्याची घाइ आहे

आमच्या उध्वस्त घरांच्या विटांचे तूम्ही बांधलेत प्रासाद,

सगळे काही लूटालेत तरी जिद्द तेव्हडी बाकी आहे

जगण्याचं अमिश दाखवू नका आम्हाला मरण्याची घाइ आहे.

Tuesday, July 27, 2010

काळोख

श्रावण साकळला थिजून गेल्या सरी, माझेच मन जाहले माझीया मनाचा अरि

उद्वेग भावना उडून गेल्या सार्या, अव्यक्त भावनांचा काळोख, पडला वारा

वाहात गेला सूर मनाचा दूर , नभ आक्रंदले अन डॊळी आल्या धारा

आठवणीचा वायू वेग थांबला, जिव भरारा वार्यावर लांबला

सोडलीस थोडी तयातच वेडी आशा, वारा आला,ती ही घेउन गेला

निशब्द मनाचा झाकोळला अंधार, वार्यावर फड्फडतो क्शिण दीन श्रूंगार

ह्या भकास सौदर्याच्या लेउअन चिंध्या, उधळण्या निघाले अंतरंग अंधार

सूर्यापरी झाकोळली स्वप्ने, अनं प्रारब्ध डागाळून गेले

वादळात विझली वात , निरांजन उलथून गेले……

Thursday, July 8, 2010

जाता जाता??

आज माझ्या सूट्टीचा शेवट्चा दिवस! पूण्यातून निघता पाय निघत नव्हता, काही अविचारी निर्णय बर्याचश्या जबाबदार्या मागे सोडून हक्काने कूठेतरी पळून जायच तर पूण्यासारखं दूसरं शहर नाही! आपलीच लोकं. आपलेपणा, प्रेम, सारं काही हक्काने देणारं एकमेव ठिकाण पूणं!
या वेळी येताना काहीच विचार नं करता बॅगेत काही वस्तू भरल्या आणी अकाउंट मध्ये उरलेले पैसे काढून मी पूण्यनगरी कडे धाव घेतली. मनात बरच काही होतं पण विचार करण्याची इच्छा आणी ताकद दोन्ही संपलं होतं. मती सून्न झाली होती. पावसाचे दिवस! मूंबैतून शिवनेरीत चढे पर्यंत चिंब भिजले, शिवनेरीतला कूडकूडाट सह्य होइ पर्यंत बसने संह्याद्री गाठला होता, बाहेर निसर्ग बहरून आला होता, डोंगरावर उतरलेले ढग, हिरविगार शिखरे पाहून मनाची मरगळ कूठच्या कूठे गेली, बर्याच गोश्टी उलगडत नव्हत्या परंतू त्यांच्या कडे बघण्याची फूरसतच मिळाली नाही. वाकडला बस थांबली, आमची बोचकी गाडीतून खाली टाकून बस निघून गेली. आभाळ राखाडी झांलं होतं. इतक्यावेळ बंद शितपेटीत बसलेला माझा जिव बाहेरची हवा लागताच आनंदला, आणी मग घरापर्यंतच्या रिक्शा प्रवासाने ’आपण पूण्यात आला आहात’ याची पूरेपूर जाणीव करून दिली. रिक्शाच्या भाड्यागणती पूणंही बरच बदललं होतं! घराची बेल वाजवली आणी मग मात्र सगळ्या जून्या आठवणींनी माझ्या बाजूला कोंडाळ केलं!
मित्र परिवाराला ’परिवार’ असं का म्हणतात हे जर कधी बघायचं असेल तर कधीतरी आमच्या बरोबर या! वयोगट ही बाब आमच्या साठी कधीच लागू पडणार नाही, आमच्या सगळ्याचं वय एकच आहे, ’धमाल’ वय! मला कधी माझ्या गरजा, दू:ख इथे बोलून दाखवावी लागत नाहीत ति जाणंली जातात! जिवाभावाचे मित्र म्हणजे आणखीन काय असतं? मग मनातल्या विचारांना मी नवव्या मजल्यावरून खाली फेकून दिलं आणी, मनमोकळेपणे सिंहगड गाठला, पूढचे दिवसं सरसर गेले, फूट्बॊल मॅच, जॅम सेशन, शिवास रिगल,मूलगी बघायचा कार्यक्रम(?), रावभाजी, रिक्शाचं भाडं, हिरवा निसर्ग, इंटरनेट, मार्झोरिन आणी बरच काही.... पक्या, सहा दिवस संपले रे! :) :(
मूंबैला जायला बॅग भरवत नव्हती, घरभर पसरलेलं सामान गोळा करावसं वाट्तच नव्हतं, पून्हा मूंबइ! पून्हा तेच चेहरे, पून्हा तेच पॊब्लेम्स! कूठे पूण्याची थंड हवा आणी कूठे मूंबइतला चिकचिकाट! कूठे आपलेपणाचा ओलावा आणी कूठे क्रूत्रीम भावना! सगळीच विचारांची भेंडोळी गूतवळा सारखी मनाच्या कोपर्यात साठू लागली. एक क्शणात झाडून टाकावित असं म्हट्लं तरी झाडूत अड्कणारी आणी प्रचंड मानसिक त्रास देणारी बोचर्या विचारांची भेंडोळी.....उद्या पहाटेची बसं, मूबैत रश अवर ला पोहोचणार, आणी मग तिच हॊर्न्स ची मरगळ, डूचमळणार्या बस ची मळमळ, घाम, प्रदूशण, चेंबूर, सायन, दादर, टॅक्सी....चेहरे....... पक्या परत कधी जायच पूण्याला?.......... :(

Tuesday, June 29, 2010

वेडी

अंधारली जेव्हा धरा काळवडले नभ
वेडीपीशी झाली राधा आठवणीत बघ

तिला दिसे तिचा कान्हा जिथे जाइ द्रूष्टी
सावळाच झाले जग सावळीच स्रूष्टी

साद घाली कन्हयाला कानी पडे कान्हा
सावळाच गंध माती, तोच गंध राना

आसूसली बावरली कानी येइना पावा
तिचे दू:ख ऐकेना, साद घाली रावा

अश्रू डोळा आशा मनी वनोवनी फिरे
खरचट्ली कोमल काया, पदी रक्त झरे

विरहात झूरली ति बावरली राधा
कान्हयावर जिचा जिव, तिचा जन्म नाही साधा........

Sunday, June 6, 2010

त्याला झोप येत नव्हती म्हणून ...... :D

सांज निजली मधाळले आभाळ
वार्या सवे आठवांचे ओले झाले आधर,
थेंबातून बरसली माझी वेडी आशा
आशय घन झाला मग मोकळा अंधार.

हळू हळू पदरव पाण्यावर उमटले
विसावली निशा हळूच तूझ्या कवेत
चांद गारवा मग विरून गेला,
पहाटेच्या मूग्ध हवेत........

:)

Tuesday, June 1, 2010

पाउस....

तो मला त्याच दिवशी का भेट्ला कोण जाणे, पण त्या दिवशी पहीला पाउस पडला! पावसात चींब भीजताना मी डोळे बंद केले आणी ते उघले तेव्हा तो एका लहानशा छत्रीत मावण्याचा प्रयत्न करत माझ्या समोर उभा होता. उंच, नाकी डोळी निट्स पण जरा बोजड शरीराचा तो, पावसात भिजणार्यातला नव्हता! मुंबैच्या वार्यात माणूस कीतीही प्रयत्न केले तरी भीजतोच, हे माहीत असूनही स्वत:ला छत्रीत माववण्याचा त्याचा निश्फळा प्रयत्न जाम गोड होता! वार्या बरोबर उड्णार्या पाण्याचे थेंब त्याच्या चश्म्यावर साठले होते आणी त्याच्या लांब नाका वरून पाण्याचा थेंब खाली ठीबणार होता, चश्म्यातून दिसाव म्हणून बारीक डोळे करून पाहाणारा तो एकटक माझ्याकडे पाहात होता. मला दोन क्शण पट्कन जाउन त्याच्या नाकावरच्या तो थेंब वेचावासा वाट्ला, म्हणून मी पूढे गेले, तर तो बाचकला. इतक्या वेळ धीटाइने माझ्यकडे एकटक पाहाणारा तो पटकन लाजला. मला फारच गम्मत वाट्ली, माझे हात त्याच्या कंबरेभोवती आपोआप फीरले, हातातली छत्री दोन्ही हाताने घट्ट पकड्त त्याने स्वत:ची भीती दडपण्याचा प्रयत्न केला. आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ आलो होतो, त्याच्या तोंडावरची आश्चर्य यूक्त भीती मला स्पश्ट दिसत होती. त्याने मला हसू आलं, आणी मग फायनली त्याच्या चेहर्यावरही हसू उमट्ल! त्याच्या गूलाबी गोर्या गालावरची खळी ओठाने टिपण्याची इच्छा मी आवरली पण पट्कन त्याच्या नाकावचा थेंब बोटावर झेलला. आम्ही वेड्यासारखे एकमेकांच्या डोळ्यात बघत उभे राहीलो!

मग कधीतरी छत्री उलटी झाली, बाजूने जाणार्या गाडीने आमच्यावर साचलेलं पाणी उड्वलं, पाउस आणखीन वाढला..... आणी आम्ही प्रेमात पडलो.

जाता जाता त्याने पाठी वळून विचारलं,
"हे सगळं ठीक आहे! पण तूझ नाव काय?"
मी हसून उत्तरले
"चातक!"
:D

Saturday, February 6, 2010

व्यवधान

आपल्या सहचराशी आपले पटेनासे होते आणी मग एक दिवस आपण वेगळे होण्याचा निर्णय घेतो. एक मेकांपासून बराच काळ वेगळे राहेल्यावर अचानक काही काळाने आपल्याला त्यांच्यातले गूण दिसू लागतात, ति व्यक्ती मग हवी हवीशी आणी जवळ असावी असं वाटू लागतं, बर्याच वेळी याची परीणीती त्या व्यक्तीला गमावल्याच्या पश्चात्तापात होते. मूळात गमतिशीर सत्य बर्याच जणांच्या लक्शात येत नाही. ति व्यक्ती जोवर आपल्या आयूश्यात असते तोवर आपल्याला हे गूण का दिसत नाहीत? हे गूण तेव्हाच दिसले असते तर आपण बहूदा त्या व्यक्तीला गमावले नसते! मग ते तेव्हा कूठे लपून बसले होते? या आणी अश्या कित्येक प्रश्नांची भेंडोळी डोक्यात जमू लागतात. शेवटी हे आपलं कमनशीबच! आपण माणूस ओळखूच शकत नाही, किंवा आपल्याला माणसांची किंमतच नाही! ही अथवा तत्सम बिरूदे आपण स्वतःला लाउन, सेल्फ पिटी या सहाजीक रस्त्यावर स्वतःला झोकून देतो. पण ही खरच या प्रश्नांची उत्तरे असतात का?

वास्तवात त्या व्यक्ती बरोबर काढलेला दिवस न दिवस आठवला तर तूम्हाला या प्रश्नांची उत्तरे सहज मीळू शकतात. त्या व्यक्तीतले हे सूप्त गूण आपल्याला जाणवत असतात आणी म्हणूनच आपण त्या व्यक्तीच्या जवळ जातो, किंवा त्या व्यक्तीला आपल्या जवळ येउन देतो. मग काही दिवसांनी आपण खूप जवळ आल्यावर आपण त्यांना आपल्या आयूश्याचा नकळत एक हिस्सा बनवून घेतो. हि व्यक्ती आयूश्यात येइ पर्यंत सारं काही आपलं आपल्या मर्जी प्रमाणे चाललेलं असतं. त्यात कोणाचाही भौतीक किव्वा वैचारीक हस्तक्शेप नसतो. मग हळू हळू आपण त्या व्यक्तीला वैचारीक पातळीवर consider करू लागतो. त्यांच्या विचारांचा ताळमेळ आपणच आपल्या विचारांशी घालू लागतो. आणी इथेच सारी गफलत होते. तूमच्या विचारांत बदल करण्याच्या पासपोर्ट्बरोबर ति व्यक्ती तूमच्या आयूश्यातल्या महत्वाच्या निर्णयांत हस्तक्शेप करण्याचा व्हिसा मिळ्वते. आणी मग भौतीक असो वा वैचारीक असो, सर्व पातळीवर स्वैर संचार करू लागते. त्या व्यक्तीच्या प्रतिभेने झाकोळले जाउन आपणही हा सोहळा कौतूकाने पाहातो, त्याचा आनंदही घेतो, पण नव्याचे नउ दिवस संपले की मात्र हिच प्रतीभा बोचू लागते.आपल्या आत्म केंद्री आयूश्यातला हा हस्तक्शेप आपल्याला आपल्या स्व पासून दूर घेउन जाइल का या भीतीने आपण त्या व्यक्तीच्या हातात दिलेला पास पोर्ट परत घेउ पाहातो. ते शक्य झाले नाही कि आपणच त्या व्यक्तीतील बारीक बारीक चूका काढू लागतो! आणी हे सारे इतके नकळत होते, कि आपल्याला जिवापाड प्रेम, आदर असणारी ति व्यक्ती अचानक आपल्या साठी एक शत्रू बनून बसते. मग वाद वाढतात, मतभेद दूणावतात, आणी शेवटी या सर्वाचा शेवट एकमेकांपासून दूर होण्यात होतो.

मग पून्हा आपल्या आयूश्याची व्यवधाने आपल्या हातात येतात आणी आपण काहीच काळात या स्थीत्यंतरातून सावरतो. मग आपण गेल्या परिस्थीचा त्रयस्थ म्हणून विचार करू लागतो. तोवर दूःखर्या जखमा बर्या झालेल्या असतात, स्वाभीमावरची सूज आटोक्यात आलेली असते. मग आपण क्शमाशील होतो. गेलेल्या काळाकडे तिर्हाइताच्या नजरेने पाहू लागतो, त्यातिल दूःख परदूःखा सारखे शितल वाटू लागते. तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीतले गूण दिसू लागतात आणी पश्चात्तापाची भावना मनात येउ लागते.

मूळात प्रश्न इथे संपतच नाही. प्रश्न इथून चालू होतात. कोणाला आपल्या आयूश्याच किती व्यवधान देउ करायच हा यक्श प्रश्न ज्याला सोडवता आला नाही त्याला इतरांतल्या गूणांना मूकावेच लागणार! नाहीतर जन्मभर मान तूकवून त्यांच्या कर्तूत्ववान छायेत जगावे लागणार! हा निर्णय सर्वस्वी तूमच्याच हातात असतो. त्या निर्णयाचं व्यवधान यावं लागतं, ते एकदा मिळालं की सगळे प्रश्न आपोआप सूटतात, कोणताही पश्चात्ताप मागे न ठेवता.

कोणीतरी फार छान लीहून गेलं

We fall In love with personality but marry with a character.