Saturday, November 6, 2010

उम्मीद पे दुनीया कायम है!

कोणत्याही अपेक्शेची सुरूवात असते ती अपेक्शा पुरतीची आशा आणी हिच आशा आपल्याला स्वप्न रंजनात घेउन जाते. एक आशा पल्लवित झाली की तिच्या जोडिला बर्याच आशांचे धुमारे फुट्तात, अपेक्शांची क्शितीजे रूंदावतात. परंतु यातील किती आशा सत्यात साकारतात?
वर्शानुवर्श या आशेवर दुनिया टिकली. मोठ्यातल्या मोठ्या धक्यातुनही पुन्हा मने सांधाणारे आशा हे एकच औषध आहे असे सगळ्या जगाने मान्य केले, परंतू एका आशेची पुर्तता झाली नाही तरी माणूस नव्या आशा ठेवत गेला आणी म्हणूनच आज पर्यंत टिकला! झालेल्या निराशेचे औषध एक नविन आशा! पण या निराशेने माणूस आशा न करण्यास कधीच धजला नाही! कारण निराशा पत्करणे म्हणजे आज पर्यंत निर्माण केलेल्या आशेचा डोलारा कोसळणार! मग जगाचे रहाट गाडगे पुढे कसे जाणार?
सारासार विचार केला तर आशावाद हा आजच्या जगाच्या वर्तमानाचा एकमेव मुलाधार आहे असे दिसून येइल, आणि कदाचीत भविष्याचा सुद्धा! उद्याची सोडाच परंतू पुढच्या काही तासांत जिवंत राहण्याची शाश्वती नसताना पेंशन प्लॅन विकत घेणारा आशावाद, ग्लोबल वॊर्मींगचे चटके बसत असतानाही, ’चलता है’ म्हणत जोरदार फटाके वाजवणारा आशावाद, घर चालवायला खिशात दमडा उरलेला नसताना मुले जन्माला घालणारा अशावाद, हे असे वर्तमानातील आशावाद भविष्यातल्या निराशेची पाळमुळं घेउनच जन्माला येताय्त. पण निराशे कडे पाठ करून आम्ही पुन्हा याचे परिणाम भोगताना नव्याने आशावाद बाळगतो!
सुखस्वप्न म्हणजे आशा, ज्याची पुर्ण होतात त्याला पुन्हा आशा ठेवण्याचा पुर्ण अधीकार आहे! परंतू ज्याची पुर्ण होत नाहीत त्याच्यासाठी पुढचं आयुश्य काढण्याची कुबडी बनतो आशावाद! तरी त्या कुबडीवर रेलून तो नव्याने पाउल पुढे टाकतो आणी नव्याने आशा धरतो, आणि कधिच कुणाला हे जाणवून देत नाही की आभाळाला स्पर्शण्याची आशा जर धरतीने केली तर ती आशा नसून निराशेची सुरूवात असते. इसी लिये तो उम्मीद पे दुनीया कायम है!

Monday, September 20, 2010

Entangled

Too entangled in my own mind unable to see outside

Thoughts and memories churning together refusing to subside

I shut one up the other opens and starts the churning again

And when one stops the other starts and all goes in vain

I fight I battle I shout I cry but it refuses to shut the hell

I scramble I tare I stab I pierce it refuses to dwindle, but dwell

I run away where my feet take me but earth shrinks at seems

I ponder on the hopeless darkness in search of one beam

I go deeper with darkness of nights and get lost in my own self

I search for light I search for dream I search for my self……

U lose your self in a nick of time too entangled in your own mind

The darkness of your towering shadow stains hope to unwind

Tuesday, August 3, 2010

जिद्द

मरण जर असेल आड तर जगण ही खाइ आहे ,

जगण्याचं अमिश दाखवू नका आम्हाला मरण्याची घाइ आहे

कुंचल्याने कोरलेल्या तुमच्या वैभवाला गिरवणारा आमचाच टाक,

आणी त्यावर रंग चढवणारी आमच्याच रक्ताची शाइ आहे

जगण्याचं अमिश दाखवू नका आम्हाला मरण्याची घाइ आहे

झिजलो उदर्नीवाहासाठी गोळा बेरीज शून्य झाली,

आता मात्र उत्तर शोधण्यासाठी झूंज देणेच सही आहे

जगण्याचं अमिश दाखवू नका आम्हाला मरण्याची घाइ आहे

आमच्या उध्वस्त घरांच्या विटांचे तूम्ही बांधलेत प्रासाद,

सगळे काही लूटालेत तरी जिद्द तेव्हडी बाकी आहे

जगण्याचं अमिश दाखवू नका आम्हाला मरण्याची घाइ आहे.

Tuesday, July 27, 2010

काळोख

श्रावण साकळला थिजून गेल्या सरी, माझेच मन जाहले माझीया मनाचा अरि

उद्वेग भावना उडून गेल्या सार्या, अव्यक्त भावनांचा काळोख, पडला वारा

वाहात गेला सूर मनाचा दूर , नभ आक्रंदले अन डॊळी आल्या धारा

आठवणीचा वायू वेग थांबला, जिव भरारा वार्यावर लांबला

सोडलीस थोडी तयातच वेडी आशा, वारा आला,ती ही घेउन गेला

निशब्द मनाचा झाकोळला अंधार, वार्यावर फड्फडतो क्शिण दीन श्रूंगार

ह्या भकास सौदर्याच्या लेउअन चिंध्या, उधळण्या निघाले अंतरंग अंधार

सूर्यापरी झाकोळली स्वप्ने, अनं प्रारब्ध डागाळून गेले

वादळात विझली वात , निरांजन उलथून गेले……

Thursday, July 8, 2010

जाता जाता??

आज माझ्या सूट्टीचा शेवट्चा दिवस! पूण्यातून निघता पाय निघत नव्हता, काही अविचारी निर्णय बर्याचश्या जबाबदार्या मागे सोडून हक्काने कूठेतरी पळून जायच तर पूण्यासारखं दूसरं शहर नाही! आपलीच लोकं. आपलेपणा, प्रेम, सारं काही हक्काने देणारं एकमेव ठिकाण पूणं!
या वेळी येताना काहीच विचार नं करता बॅगेत काही वस्तू भरल्या आणी अकाउंट मध्ये उरलेले पैसे काढून मी पूण्यनगरी कडे धाव घेतली. मनात बरच काही होतं पण विचार करण्याची इच्छा आणी ताकद दोन्ही संपलं होतं. मती सून्न झाली होती. पावसाचे दिवस! मूंबैतून शिवनेरीत चढे पर्यंत चिंब भिजले, शिवनेरीतला कूडकूडाट सह्य होइ पर्यंत बसने संह्याद्री गाठला होता, बाहेर निसर्ग बहरून आला होता, डोंगरावर उतरलेले ढग, हिरविगार शिखरे पाहून मनाची मरगळ कूठच्या कूठे गेली, बर्याच गोश्टी उलगडत नव्हत्या परंतू त्यांच्या कडे बघण्याची फूरसतच मिळाली नाही. वाकडला बस थांबली, आमची बोचकी गाडीतून खाली टाकून बस निघून गेली. आभाळ राखाडी झांलं होतं. इतक्यावेळ बंद शितपेटीत बसलेला माझा जिव बाहेरची हवा लागताच आनंदला, आणी मग घरापर्यंतच्या रिक्शा प्रवासाने ’आपण पूण्यात आला आहात’ याची पूरेपूर जाणीव करून दिली. रिक्शाच्या भाड्यागणती पूणंही बरच बदललं होतं! घराची बेल वाजवली आणी मग मात्र सगळ्या जून्या आठवणींनी माझ्या बाजूला कोंडाळ केलं!
मित्र परिवाराला ’परिवार’ असं का म्हणतात हे जर कधी बघायचं असेल तर कधीतरी आमच्या बरोबर या! वयोगट ही बाब आमच्या साठी कधीच लागू पडणार नाही, आमच्या सगळ्याचं वय एकच आहे, ’धमाल’ वय! मला कधी माझ्या गरजा, दू:ख इथे बोलून दाखवावी लागत नाहीत ति जाणंली जातात! जिवाभावाचे मित्र म्हणजे आणखीन काय असतं? मग मनातल्या विचारांना मी नवव्या मजल्यावरून खाली फेकून दिलं आणी, मनमोकळेपणे सिंहगड गाठला, पूढचे दिवसं सरसर गेले, फूट्बॊल मॅच, जॅम सेशन, शिवास रिगल,मूलगी बघायचा कार्यक्रम(?), रावभाजी, रिक्शाचं भाडं, हिरवा निसर्ग, इंटरनेट, मार्झोरिन आणी बरच काही.... पक्या, सहा दिवस संपले रे! :) :(
मूंबैला जायला बॅग भरवत नव्हती, घरभर पसरलेलं सामान गोळा करावसं वाट्तच नव्हतं, पून्हा मूंबइ! पून्हा तेच चेहरे, पून्हा तेच पॊब्लेम्स! कूठे पूण्याची थंड हवा आणी कूठे मूंबइतला चिकचिकाट! कूठे आपलेपणाचा ओलावा आणी कूठे क्रूत्रीम भावना! सगळीच विचारांची भेंडोळी गूतवळा सारखी मनाच्या कोपर्यात साठू लागली. एक क्शणात झाडून टाकावित असं म्हट्लं तरी झाडूत अड्कणारी आणी प्रचंड मानसिक त्रास देणारी बोचर्या विचारांची भेंडोळी.....उद्या पहाटेची बसं, मूबैत रश अवर ला पोहोचणार, आणी मग तिच हॊर्न्स ची मरगळ, डूचमळणार्या बस ची मळमळ, घाम, प्रदूशण, चेंबूर, सायन, दादर, टॅक्सी....चेहरे....... पक्या परत कधी जायच पूण्याला?.......... :(

Tuesday, June 29, 2010

वेडी

अंधारली जेव्हा धरा काळवडले नभ
वेडीपीशी झाली राधा आठवणीत बघ

तिला दिसे तिचा कान्हा जिथे जाइ द्रूष्टी
सावळाच झाले जग सावळीच स्रूष्टी

साद घाली कन्हयाला कानी पडे कान्हा
सावळाच गंध माती, तोच गंध राना

आसूसली बावरली कानी येइना पावा
तिचे दू:ख ऐकेना, साद घाली रावा

अश्रू डोळा आशा मनी वनोवनी फिरे
खरचट्ली कोमल काया, पदी रक्त झरे

विरहात झूरली ति बावरली राधा
कान्हयावर जिचा जिव, तिचा जन्म नाही साधा........

Sunday, June 6, 2010

त्याला झोप येत नव्हती म्हणून ...... :D

सांज निजली मधाळले आभाळ
वार्या सवे आठवांचे ओले झाले आधर,
थेंबातून बरसली माझी वेडी आशा
आशय घन झाला मग मोकळा अंधार.

हळू हळू पदरव पाण्यावर उमटले
विसावली निशा हळूच तूझ्या कवेत
चांद गारवा मग विरून गेला,
पहाटेच्या मूग्ध हवेत........

:)

Tuesday, June 1, 2010

पाउस....

तो मला त्याच दिवशी का भेट्ला कोण जाणे, पण त्या दिवशी पहीला पाउस पडला! पावसात चींब भीजताना मी डोळे बंद केले आणी ते उघले तेव्हा तो एका लहानशा छत्रीत मावण्याचा प्रयत्न करत माझ्या समोर उभा होता. उंच, नाकी डोळी निट्स पण जरा बोजड शरीराचा तो, पावसात भिजणार्यातला नव्हता! मुंबैच्या वार्यात माणूस कीतीही प्रयत्न केले तरी भीजतोच, हे माहीत असूनही स्वत:ला छत्रीत माववण्याचा त्याचा निश्फळा प्रयत्न जाम गोड होता! वार्या बरोबर उड्णार्या पाण्याचे थेंब त्याच्या चश्म्यावर साठले होते आणी त्याच्या लांब नाका वरून पाण्याचा थेंब खाली ठीबणार होता, चश्म्यातून दिसाव म्हणून बारीक डोळे करून पाहाणारा तो एकटक माझ्याकडे पाहात होता. मला दोन क्शण पट्कन जाउन त्याच्या नाकावरच्या तो थेंब वेचावासा वाट्ला, म्हणून मी पूढे गेले, तर तो बाचकला. इतक्या वेळ धीटाइने माझ्यकडे एकटक पाहाणारा तो पटकन लाजला. मला फारच गम्मत वाट्ली, माझे हात त्याच्या कंबरेभोवती आपोआप फीरले, हातातली छत्री दोन्ही हाताने घट्ट पकड्त त्याने स्वत:ची भीती दडपण्याचा प्रयत्न केला. आम्ही एकमेकांच्या खूपच जवळ आलो होतो, त्याच्या तोंडावरची आश्चर्य यूक्त भीती मला स्पश्ट दिसत होती. त्याने मला हसू आलं, आणी मग फायनली त्याच्या चेहर्यावरही हसू उमट्ल! त्याच्या गूलाबी गोर्या गालावरची खळी ओठाने टिपण्याची इच्छा मी आवरली पण पट्कन त्याच्या नाकावचा थेंब बोटावर झेलला. आम्ही वेड्यासारखे एकमेकांच्या डोळ्यात बघत उभे राहीलो!

मग कधीतरी छत्री उलटी झाली, बाजूने जाणार्या गाडीने आमच्यावर साचलेलं पाणी उड्वलं, पाउस आणखीन वाढला..... आणी आम्ही प्रेमात पडलो.

जाता जाता त्याने पाठी वळून विचारलं,
"हे सगळं ठीक आहे! पण तूझ नाव काय?"
मी हसून उत्तरले
"चातक!"
:D

Saturday, February 6, 2010

व्यवधान

आपल्या सहचराशी आपले पटेनासे होते आणी मग एक दिवस आपण वेगळे होण्याचा निर्णय घेतो. एक मेकांपासून बराच काळ वेगळे राहेल्यावर अचानक काही काळाने आपल्याला त्यांच्यातले गूण दिसू लागतात, ति व्यक्ती मग हवी हवीशी आणी जवळ असावी असं वाटू लागतं, बर्याच वेळी याची परीणीती त्या व्यक्तीला गमावल्याच्या पश्चात्तापात होते. मूळात गमतिशीर सत्य बर्याच जणांच्या लक्शात येत नाही. ति व्यक्ती जोवर आपल्या आयूश्यात असते तोवर आपल्याला हे गूण का दिसत नाहीत? हे गूण तेव्हाच दिसले असते तर आपण बहूदा त्या व्यक्तीला गमावले नसते! मग ते तेव्हा कूठे लपून बसले होते? या आणी अश्या कित्येक प्रश्नांची भेंडोळी डोक्यात जमू लागतात. शेवटी हे आपलं कमनशीबच! आपण माणूस ओळखूच शकत नाही, किंवा आपल्याला माणसांची किंमतच नाही! ही अथवा तत्सम बिरूदे आपण स्वतःला लाउन, सेल्फ पिटी या सहाजीक रस्त्यावर स्वतःला झोकून देतो. पण ही खरच या प्रश्नांची उत्तरे असतात का?

वास्तवात त्या व्यक्ती बरोबर काढलेला दिवस न दिवस आठवला तर तूम्हाला या प्रश्नांची उत्तरे सहज मीळू शकतात. त्या व्यक्तीतले हे सूप्त गूण आपल्याला जाणवत असतात आणी म्हणूनच आपण त्या व्यक्तीच्या जवळ जातो, किंवा त्या व्यक्तीला आपल्या जवळ येउन देतो. मग काही दिवसांनी आपण खूप जवळ आल्यावर आपण त्यांना आपल्या आयूश्याचा नकळत एक हिस्सा बनवून घेतो. हि व्यक्ती आयूश्यात येइ पर्यंत सारं काही आपलं आपल्या मर्जी प्रमाणे चाललेलं असतं. त्यात कोणाचाही भौतीक किव्वा वैचारीक हस्तक्शेप नसतो. मग हळू हळू आपण त्या व्यक्तीला वैचारीक पातळीवर consider करू लागतो. त्यांच्या विचारांचा ताळमेळ आपणच आपल्या विचारांशी घालू लागतो. आणी इथेच सारी गफलत होते. तूमच्या विचारांत बदल करण्याच्या पासपोर्ट्बरोबर ति व्यक्ती तूमच्या आयूश्यातल्या महत्वाच्या निर्णयांत हस्तक्शेप करण्याचा व्हिसा मिळ्वते. आणी मग भौतीक असो वा वैचारीक असो, सर्व पातळीवर स्वैर संचार करू लागते. त्या व्यक्तीच्या प्रतिभेने झाकोळले जाउन आपणही हा सोहळा कौतूकाने पाहातो, त्याचा आनंदही घेतो, पण नव्याचे नउ दिवस संपले की मात्र हिच प्रतीभा बोचू लागते.आपल्या आत्म केंद्री आयूश्यातला हा हस्तक्शेप आपल्याला आपल्या स्व पासून दूर घेउन जाइल का या भीतीने आपण त्या व्यक्तीच्या हातात दिलेला पास पोर्ट परत घेउ पाहातो. ते शक्य झाले नाही कि आपणच त्या व्यक्तीतील बारीक बारीक चूका काढू लागतो! आणी हे सारे इतके नकळत होते, कि आपल्याला जिवापाड प्रेम, आदर असणारी ति व्यक्ती अचानक आपल्या साठी एक शत्रू बनून बसते. मग वाद वाढतात, मतभेद दूणावतात, आणी शेवटी या सर्वाचा शेवट एकमेकांपासून दूर होण्यात होतो.

मग पून्हा आपल्या आयूश्याची व्यवधाने आपल्या हातात येतात आणी आपण काहीच काळात या स्थीत्यंतरातून सावरतो. मग आपण गेल्या परिस्थीचा त्रयस्थ म्हणून विचार करू लागतो. तोवर दूःखर्या जखमा बर्या झालेल्या असतात, स्वाभीमावरची सूज आटोक्यात आलेली असते. मग आपण क्शमाशील होतो. गेलेल्या काळाकडे तिर्हाइताच्या नजरेने पाहू लागतो, त्यातिल दूःख परदूःखा सारखे शितल वाटू लागते. तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीतले गूण दिसू लागतात आणी पश्चात्तापाची भावना मनात येउ लागते.

मूळात प्रश्न इथे संपतच नाही. प्रश्न इथून चालू होतात. कोणाला आपल्या आयूश्याच किती व्यवधान देउ करायच हा यक्श प्रश्न ज्याला सोडवता आला नाही त्याला इतरांतल्या गूणांना मूकावेच लागणार! नाहीतर जन्मभर मान तूकवून त्यांच्या कर्तूत्ववान छायेत जगावे लागणार! हा निर्णय सर्वस्वी तूमच्याच हातात असतो. त्या निर्णयाचं व्यवधान यावं लागतं, ते एकदा मिळालं की सगळे प्रश्न आपोआप सूटतात, कोणताही पश्चात्ताप मागे न ठेवता.

कोणीतरी फार छान लीहून गेलं

We fall In love with personality but marry with a character.

Sunday, January 17, 2010

Lost

can i rewind and go back in time
to correct my life and to make it more mine.

leave the shallow ones below and float amongs the cream
and will never ever meet some ppl in my wildest dream

will go on the path i always wanted to follow
will never face the expectations sick and hollow

how i wish i could change what i had brought along
and will never ever ,ever go wrong.....

Tuesday, January 12, 2010

कातरवेळ

डोळ्यासमोर सारी कामे नाचत होती, पण आज मन कुठेतरी दूसरीकडेच होते. कॊंप्युटर वर सतत काम करुन पाठ आखडली होती, आणी शेवटचे अन्न ग्रहण कधी केले ह्याचा काही हिशोबच उरला नव्हता. तरीही डोळे स्क्रीन सोडत नव्हते. कातरवेळ, तिन्हीसांज अस जे काय म्हणतात ती झाली होती, पण तीथे बघायला वेळ कोणाला होता? ऒफीसातले सगळे निघून गेले होते. मला क्शणभर फार एकाकी वटलं. आल्या पावली मी त्या एकाकीपणाला हकलवलं आणी पुन्हा एक्सेल शीट मध्ये डोक घातलं. पण हळू हळू डोळेही खुपच झोंबायला लागले, आता ब्रेक घेणं अपरीहार्य होतं ! डोळ्यांवर पाणी मारण्या साठि मी डेस्क सोडला

गार पाण्याच्या हबक्याने माझ्या डोळ्यावरची कामाची गुंगी उतरली. पुन्हा कॊंप्युटर वर बसण्याची इच्छा होइना. ऒफीसात कुणीच नसले तर जाता जात पिउन दोन खिडक्या उघडून जातो. त्याला माझी उशीरा पर्यंत काम करण्याची सवय परीचयाची आहे. ऒफिसातील बाकी सारे जितक्या लवकर जाता येइल तितके आनंदात असतात, पण मला कसलीच घाइ नसते.

माझी पावलं नकळत खीडकी कडे वळली , खिडकीच्या बाजुला उभ्या कॊफी मशीनला एक कॊफी बनवायला सांगून त्याच्या प्रतीक्शेत मी खिडकी जवळ गेलो. बाहेरच आभाळ तांबूसल होतं, काळ्या ढगांच्या किनारीला सोनवर्ख फुटला होता, आभाळात केशर उधळलं होतं कोणीतरी, मनात आलेल्या या कवीकल्पनेने मला गालातल्या गालात हसु आलं, थोड वेडगळ वाटलं. मनातले विचार झटकत मी पुन्हा कॊफी मशीन कडे वळलो, तेव्हाच वार्याची एक झूळूक आली, तिच्या आर्द्र थंडाव्यात गरम कॊफीचा गंध मिसळला आणी त्या सोबत आली तिची आठवण….

बॅंड स्टॅड च्या कॅफे मध्ये समुद्रावरुन घोघावत येणारा वरा आणी त्या बरोबर दरवळणारा टेबलावर ठेवलेल्या कॊफीचा गंध, अगदी असाच! आजच्या सारखा…. पण आज त्यात तिच्या हलक्या स्मीताचा दरवळ नव्हता…. मन विशण्ण झालं…. अंतरात एक अजाण काहूर उठलं, ज्याला उत्तरही नव्हतं आणी उपायही सापडणार नव्हता. हीच हूरहूर रोज एक्सेल शीट्स मध्ये डोक घालून नजरेआड करण्याचा प्रयत्न करत आलो, पण आज मात्र मला त्या कातरवेळेने गाठलं होतं…..